अमृत देशमुख आणि अमित गोडसे यांच्या ‘वेध’च्या सेशननंतर जयदीप पाटील आणि संजय पुजारी यांचं सेशन होतं. दोघंही शिक्षक आहेत. पहिल्यांदा जयदीप पाटिल यांच्याशी गप्पा सुरू झाल्या….
‘वेध’ हा भाषणांचा कार्यक्रम असतो. इथं थीमनुसार वक्ते बोलावले जातात आणि ते त्यांच्या करीयरसंबंधी, त्यांच्या कामासंबंधी, प्रेरणादायक अशा गप्पा मारतात. ह्यावेळची थीम होती, “झपाटलेपण ते जाणतेपण”.
ज्यांनी “झपाटलेपणा”ने स्वतःला रूची वाटणा-या विषयात काम सुरू केलं, आणि आता चिकाटीने, “जाणतेपणा”ने त्याच विषयात पुढे वाटचाल करत आहेत, असे वक्ते ह्यावेळच्या ‘वेध’ला आले होते.
हा कार्यक्रम आय. पी. एच. (IPH- Institute for psychological Health) ह्यांचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट होता. पुण्यात ह्याचं आयोजन एम. सी. दातार क्लासेस, आणि पळशीकर इंस्टिट्यूट, ह्यांनी केलं.
जयदीप पाटील हे जळगावातल्या 'कल्याणहोळ' गावचे. त्यांनी लहानपणीपासूनच त्यांच्या गावात जादूटोणा, कर्मकांड, असं सगळं बघितलं. त्यांची आई खूप श्रद्धाळू होती. पण तरी जयदीप यांना विज्ञानाची आवड होती. त्यांच्या घरी टि.व्ही नव्हता, फ्रिज नव्हता, तरी ‘टि.व्ही कसा चालतो’, किंवा ‘फ्रिज कसा चालतो’ ह्याची माहिती करून घेऊन त्यांनी त्या गोष्टींची उणीव भरून काढली होती. हळू हळू करत त्यांची विज्ञानाची आवड वाढत गेली. त्यांचं स्वप्न होतं, एक कृतिशील शिक्षक बनायचं. त्यांनी ते पुर्ण केलं. त्यांनी त्यांच्या शाळेची सहल एकदा ‘इस्रो’ (ISRO)ला नेली! जादूटोणा वगैरे बंद करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन जागवणं महत्वाचं आहे हे त्यांना जाणवलं. त्या नुसार ते त्यांच्या गावात काम करत आहेत.
त्यांचं गाव आता 'विज्ञान गाव' म्हणून ओळखलं जातं. त्यांनी एक 'मिशन नोबेल प्राईज' नावाची एक चळवळ उभी केली आहे. ह्या चळवळीची सुरूवात कशी झाली, हे त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की, एकदा एका वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर 'भारताला नोबेल प्राईज' अशी मोठी बातमी आली. त्यात एक ओळ आली की, अमेरिकेची लोकसंख्या ६५ कोटी आहे, तरी त्यांच्यात १०-१५ नोबेल प्राईज विजेते, आणि आपली लोकसंख्या काहीशे कोटी असुनही आपले फक्त ३-४ नोबेल प्राईज विजेते का? हे स्टॅटिस्टिक्स त्यांना काही पटलं नाही. मग त्यांनी ठरवलं की, आपणच त्यासाठी प्रयत्न करायचे, आणि मग अशी तयार झाली, 'मिशन नोबेल प्राईज' चळवळ. ह्या अंतर्गत ते त्यांच्या गावाजवळच्या काही शाळांमधे आणि महाविद्यालयांमधे नोबेल प्राईज म्हणजे नक्की काय आहे, आणि ते मिळणं आपल्याला कसं जरूरी आहे, ह्याविषयी लेक्चर द्यायचे.
अशी लेक्चर्स देत असताना त्यांना एकांनी असं सांगितलं की, यावर नुसतं बोलून काही नाही होणार. ह्यासाठी काहीतरी क्रियेटिव्ह वर्क केलं पाहिजे. ठोस काम केलं पाहिजे. मग त्यांना असं वाटलं की, ह्यासाठी आपण सगळ्यांमधे वैज्ञानिक दृष्टिकोन तयार केला पाहिजे. त्यांच्या गावात कर्मकांड, भोंदूगिरी खूप चालायची. हे सगळं घालवण्यासाठी लोकांना विज्ञानाच्या माध्यमातून शहाणं केलं पाहिजे असं त्यांना असं वाटलं, आणि मग त्यांनी त्यांच्या गावाला 'विज्ञान गाव' करायची तयारी सुरू केली. सध्या त्यांच्या गावातल्या प्रत्येक विजेच्या खांबावर वेगवेगळ्या शास्त्रज्ञांचे फोटो आहेत. ठिकठकाणी विज्ञान केंद्रे आहेत. शाळेतील मुलांमधे प्रयोग करून बघण्याची गोडी निर्माण करण्यात येत आहे.
मला ही कल्पना जरा वेगळी वाटली. मी नुकताच महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या ‘पुस्तकांच्या गावा’ला (भिलार, ता. महाबळेश्वर, जि. सातारा) जाऊन आलो. त्यामुळे आता हे ‘विज्ञान गाव’ कसं असेल, हे जाणून घ्यायची उत्सूकता वाढली आहे. काहीतरी वेगळी कल्पना असणार हे नक्की…
जयदीप यांच्यासोबतच संजय पुजारी यांच्याशीही गप्पा सुरू झाल्या. त्यांच्याबद्दल पुढच्या पोस्टमधे...
‘वेध’ हा भाषणांचा कार्यक्रम असतो. इथं थीमनुसार वक्ते बोलावले जातात आणि ते त्यांच्या करीयरसंबंधी, त्यांच्या कामासंबंधी, प्रेरणादायक अशा गप्पा मारतात. ह्यावेळची थीम होती, “झपाटलेपण ते जाणतेपण”.
ज्यांनी “झपाटलेपणा”ने स्वतःला रूची वाटणा-या विषयात काम सुरू केलं, आणि आता चिकाटीने, “जाणतेपणा”ने त्याच विषयात पुढे वाटचाल करत आहेत, असे वक्ते ह्यावेळच्या ‘वेध’ला आले होते.
हा कार्यक्रम आय. पी. एच. (IPH- Institute for psychological Health) ह्यांचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट होता. पुण्यात ह्याचं आयोजन एम. सी. दातार क्लासेस, आणि पळशीकर इंस्टिट्यूट, ह्यांनी केलं.
जयदीप पाटील हे जळगावातल्या 'कल्याणहोळ' गावचे. त्यांनी लहानपणीपासूनच त्यांच्या गावात जादूटोणा, कर्मकांड, असं सगळं बघितलं. त्यांची आई खूप श्रद्धाळू होती. पण तरी जयदीप यांना विज्ञानाची आवड होती. त्यांच्या घरी टि.व्ही नव्हता, फ्रिज नव्हता, तरी ‘टि.व्ही कसा चालतो’, किंवा ‘फ्रिज कसा चालतो’ ह्याची माहिती करून घेऊन त्यांनी त्या गोष्टींची उणीव भरून काढली होती. हळू हळू करत त्यांची विज्ञानाची आवड वाढत गेली. त्यांचं स्वप्न होतं, एक कृतिशील शिक्षक बनायचं. त्यांनी ते पुर्ण केलं. त्यांनी त्यांच्या शाळेची सहल एकदा ‘इस्रो’ (ISRO)ला नेली! जादूटोणा वगैरे बंद करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन जागवणं महत्वाचं आहे हे त्यांना जाणवलं. त्या नुसार ते त्यांच्या गावात काम करत आहेत.
त्यांचं गाव आता 'विज्ञान गाव' म्हणून ओळखलं जातं. त्यांनी एक 'मिशन नोबेल प्राईज' नावाची एक चळवळ उभी केली आहे. ह्या चळवळीची सुरूवात कशी झाली, हे त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की, एकदा एका वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर 'भारताला नोबेल प्राईज' अशी मोठी बातमी आली. त्यात एक ओळ आली की, अमेरिकेची लोकसंख्या ६५ कोटी आहे, तरी त्यांच्यात १०-१५ नोबेल प्राईज विजेते, आणि आपली लोकसंख्या काहीशे कोटी असुनही आपले फक्त ३-४ नोबेल प्राईज विजेते का? हे स्टॅटिस्टिक्स त्यांना काही पटलं नाही. मग त्यांनी ठरवलं की, आपणच त्यासाठी प्रयत्न करायचे, आणि मग अशी तयार झाली, 'मिशन नोबेल प्राईज' चळवळ. ह्या अंतर्गत ते त्यांच्या गावाजवळच्या काही शाळांमधे आणि महाविद्यालयांमधे नोबेल प्राईज म्हणजे नक्की काय आहे, आणि ते मिळणं आपल्याला कसं जरूरी आहे, ह्याविषयी लेक्चर द्यायचे.
अशी लेक्चर्स देत असताना त्यांना एकांनी असं सांगितलं की, यावर नुसतं बोलून काही नाही होणार. ह्यासाठी काहीतरी क्रियेटिव्ह वर्क केलं पाहिजे. ठोस काम केलं पाहिजे. मग त्यांना असं वाटलं की, ह्यासाठी आपण सगळ्यांमधे वैज्ञानिक दृष्टिकोन तयार केला पाहिजे. त्यांच्या गावात कर्मकांड, भोंदूगिरी खूप चालायची. हे सगळं घालवण्यासाठी लोकांना विज्ञानाच्या माध्यमातून शहाणं केलं पाहिजे असं त्यांना असं वाटलं, आणि मग त्यांनी त्यांच्या गावाला 'विज्ञान गाव' करायची तयारी सुरू केली. सध्या त्यांच्या गावातल्या प्रत्येक विजेच्या खांबावर वेगवेगळ्या शास्त्रज्ञांचे फोटो आहेत. ठिकठकाणी विज्ञान केंद्रे आहेत. शाळेतील मुलांमधे प्रयोग करून बघण्याची गोडी निर्माण करण्यात येत आहे.
मला ही कल्पना जरा वेगळी वाटली. मी नुकताच महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या ‘पुस्तकांच्या गावा’ला (भिलार, ता. महाबळेश्वर, जि. सातारा) जाऊन आलो. त्यामुळे आता हे ‘विज्ञान गाव’ कसं असेल, हे जाणून घ्यायची उत्सूकता वाढली आहे. काहीतरी वेगळी कल्पना असणार हे नक्की…
जयदीप यांच्यासोबतच संजय पुजारी यांच्याशीही गप्पा सुरू झाल्या. त्यांच्याबद्दल पुढच्या पोस्टमधे...
No comments:
Post a Comment