२१ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबरला, 'आय. पी. एच' प्रस्तुत आणि एम. सी. दातार क्लासेस व पळशीकर इन्स्टिट्यूट आयोजित 'वेध, पुणे' ह्या कार्यक्रमाला गेलो होतो. ह्या वर्षीच्या वेधचं सूत्र होतं, "बदल पेरणारी माणसं".
पुढचं सत्र होतं अनिश नाथ आणि असिता नाथ याचं. दोघांनी लखनौ जवळच्या पश्चिम नावाच्या गावात “गुड हार्वेस्ट स्कूल” नावाची मुलींसाठी शेतीचं शिक्षण देणारी भारतातील पहिली प्राथमिक शाळा सुरू केलीये. आणि विशेष म्हणजे दिल्लीतली चांगली, भरपूर पैसे देणारी नोकरी सोडून दोघं त्यांच्या आवडत्या क्षेत्रात आहेत. त्यामुळं शाळा का सुरू करावीशी वाटली हा प्रश्न आहेच, पण त्यांना आधी विचारण्यात आलं, की तुम्हाला नोकरी सोडावीशी का वाटली?
अनिश नाथ म्हणाले, की त्यांच्या कंपनीत काम करणारे सगळे सिनिअर्स हे खूप स्ट्रेसमधे असायचे. त्यांच्याकडे बघून असं वाटायचं, की आपल्याला प्रमोशन मिळाल्यावर आपण पण असंच स्ट्रेस खाली वावरणार का? हे लक्षात आल्यापासून त्यांनी ठरवून टाकलं, की आपण एखाद्या गावात जाऊन शेती करायची. त्यांनी पटकन निर्णय घेतला, आणि लखनौजवळच्या ‘पश्चिम’ नावाच्या गावात २ एकर जागा घेतली.
आता हे गाव म्हणजे काही त्यांचं मुळचं गाव नव्हे. त्यामुळे तिथं रहायचं म्हणजे ओळखी बनवण्यापासून सुरूवात होती. असं सगळं होत असताना, त्यांना काही गोष्टी लक्षात आल्या, पहिली गोष्ट, इकडची बरीचशी मुलं मुली कुठंही शिकायला जात नाहीत. बरीचशी घरकामातच मदत करतात, छोट्या भावंडांना संभाळतात, गुरं चरायला नेतात, इकडं तिकडं हिंडतात. दुसरी, इकडच्या तरूण लोकांना शेती करायची अजिबात इच्छा नाही. प्रत्येकाला शहरात जायचं आहे. गावात खूप कमी लोक आहेत की ज्यांना शेती करायची आहे. ह्या दोन्ही गोष्टी बघून अनिश आणि असिता ह्यांना वाटलं, ह्या लोकांना शिक्षण तर मिळालं पाहिजे, तसंच तरूण लोकांनी शेती सुरू करावी, म्हणूनही काहीतरी केलं पाहिजे. ह्या गावात शेती जरा जुन्या पद्धतीने होते. इतर ठिकाणी एका वर्षात ३ पिकं काढली जातात. पश्चिम गावात एका वर्षात एकच पिक काढलं जातं. त्यामुळं त्यांना शेतीतल्या नविन पद्धती शिकवणं भाग होतं. त्यासाठी शाळा काढली पाहिजे.
मग त्यांनी गावकऱ्यांना समजावायला सुरूवात केली. गावकऱ्यांना वाटायचं की हे आपल्याला शेती काय शिकवणार? अजुन काय शिकायचंय? इतकी वर्षं शेती तर करतोय… असे भरपूर प्रश्न असायचे. मुलांना काय शिकवणार? शाळा कुठे भरवणार? बिल्डिंग नाही तर शाळा कशी भरवणार?
अशा सगळ्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली. थोडा विश्वास बसल्यावर त्यांनी काही मुलींना पाठवलं. पहिल्यांदा एकूण ६ मुली होत्या, पण सध्या वाढत वाढत संख्या ४६च्या वर गेलीये. २०१६ साली त्यांनी गूड हार्वेस्ट स्कूल चालू केली. २०१४ साली अनिश आणि असिता नाथ या गावात राहायला आले होते.
त्यांना विचारण्यात आलं, की त्यांनी फक्त मुलींची शाळा का काढली? मुलींना शेतीचं शिक्षण द्यायचं का ठरवलं? सर्वसाधारणपणे आपण बघतो, की शेतकरी पुरूष असतात. मग फक्त मुलींना शेतीचं शिक्षण का?
त्यांनी सांगितलं, हा दृष्टिकोन थोडा चुकीचा आहे. आपल्याला ट्रॅक्टर चालवताना किंवा काही ठराविक कामं करताना पुरूष दिसतात, म्हणून आपण म्हणतो की शेतकरी पुरूष असतात. खरंतर शेतीतली बरीच कामं स्त्रिया करतात. शेतातली बरीच कामं अशी असतात, की जी फक्त स्त्रियाच करू शकतात. त्यामुळे त्यांना शिक्षण मिळणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं.
ह्या शाळेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, ह्या शाळेत इयत्ता नाहीत. इकडच्या अगदी लहान मुलीपासून १५ – १६ वर्षांच्या मुलींपर्यंत सगळे एकत्रच शिकतात. प्रत्येकाचा शिकण्याचा कल, वेग वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे ह्या शाळेत मुलं त्यांना जे आवडेल ते, आवडेल तेव्हा शिकतात. कोणावरही बंधनं नसतात.
ह्या शाळेत फक्त शेती शिकवली जात नाही, तर शेतीपूरक ‘पशूपालन’ आणि इतरही काही गोष्टी शिकवल्या जातात. वेगवेगळे विषय, लिहायला वाचायला शिकवलं जातं. अनिश आणि असिता यांनी २०२२ पर्यंत शाळेला शाळेच्या उत्पन्नातून सक्षम बनवायचं ठरवलं आहे.
मी ह्या शाळेबद्दल कधीच ऐकलं नव्हतं. मुलींना शेतीविषयक शिक्षण देणारी प्राथमिक शाळा बघून, त्याबद्दल ऐकून खरंच खूप छान वाटलं.
पुढचं सत्र होतं अनिश नाथ आणि असिता नाथ याचं. दोघांनी लखनौ जवळच्या पश्चिम नावाच्या गावात “गुड हार्वेस्ट स्कूल” नावाची मुलींसाठी शेतीचं शिक्षण देणारी भारतातील पहिली प्राथमिक शाळा सुरू केलीये. आणि विशेष म्हणजे दिल्लीतली चांगली, भरपूर पैसे देणारी नोकरी सोडून दोघं त्यांच्या आवडत्या क्षेत्रात आहेत. त्यामुळं शाळा का सुरू करावीशी वाटली हा प्रश्न आहेच, पण त्यांना आधी विचारण्यात आलं, की तुम्हाला नोकरी सोडावीशी का वाटली?
अनिश नाथ म्हणाले, की त्यांच्या कंपनीत काम करणारे सगळे सिनिअर्स हे खूप स्ट्रेसमधे असायचे. त्यांच्याकडे बघून असं वाटायचं, की आपल्याला प्रमोशन मिळाल्यावर आपण पण असंच स्ट्रेस खाली वावरणार का? हे लक्षात आल्यापासून त्यांनी ठरवून टाकलं, की आपण एखाद्या गावात जाऊन शेती करायची. त्यांनी पटकन निर्णय घेतला, आणि लखनौजवळच्या ‘पश्चिम’ नावाच्या गावात २ एकर जागा घेतली.
आता हे गाव म्हणजे काही त्यांचं मुळचं गाव नव्हे. त्यामुळे तिथं रहायचं म्हणजे ओळखी बनवण्यापासून सुरूवात होती. असं सगळं होत असताना, त्यांना काही गोष्टी लक्षात आल्या, पहिली गोष्ट, इकडची बरीचशी मुलं मुली कुठंही शिकायला जात नाहीत. बरीचशी घरकामातच मदत करतात, छोट्या भावंडांना संभाळतात, गुरं चरायला नेतात, इकडं तिकडं हिंडतात. दुसरी, इकडच्या तरूण लोकांना शेती करायची अजिबात इच्छा नाही. प्रत्येकाला शहरात जायचं आहे. गावात खूप कमी लोक आहेत की ज्यांना शेती करायची आहे. ह्या दोन्ही गोष्टी बघून अनिश आणि असिता ह्यांना वाटलं, ह्या लोकांना शिक्षण तर मिळालं पाहिजे, तसंच तरूण लोकांनी शेती सुरू करावी, म्हणूनही काहीतरी केलं पाहिजे. ह्या गावात शेती जरा जुन्या पद्धतीने होते. इतर ठिकाणी एका वर्षात ३ पिकं काढली जातात. पश्चिम गावात एका वर्षात एकच पिक काढलं जातं. त्यामुळं त्यांना शेतीतल्या नविन पद्धती शिकवणं भाग होतं. त्यासाठी शाळा काढली पाहिजे.
मग त्यांनी गावकऱ्यांना समजावायला सुरूवात केली. गावकऱ्यांना वाटायचं की हे आपल्याला शेती काय शिकवणार? अजुन काय शिकायचंय? इतकी वर्षं शेती तर करतोय… असे भरपूर प्रश्न असायचे. मुलांना काय शिकवणार? शाळा कुठे भरवणार? बिल्डिंग नाही तर शाळा कशी भरवणार?
अशा सगळ्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली. थोडा विश्वास बसल्यावर त्यांनी काही मुलींना पाठवलं. पहिल्यांदा एकूण ६ मुली होत्या, पण सध्या वाढत वाढत संख्या ४६च्या वर गेलीये. २०१६ साली त्यांनी गूड हार्वेस्ट स्कूल चालू केली. २०१४ साली अनिश आणि असिता नाथ या गावात राहायला आले होते.
त्यांना विचारण्यात आलं, की त्यांनी फक्त मुलींची शाळा का काढली? मुलींना शेतीचं शिक्षण द्यायचं का ठरवलं? सर्वसाधारणपणे आपण बघतो, की शेतकरी पुरूष असतात. मग फक्त मुलींना शेतीचं शिक्षण का?
त्यांनी सांगितलं, हा दृष्टिकोन थोडा चुकीचा आहे. आपल्याला ट्रॅक्टर चालवताना किंवा काही ठराविक कामं करताना पुरूष दिसतात, म्हणून आपण म्हणतो की शेतकरी पुरूष असतात. खरंतर शेतीतली बरीच कामं स्त्रिया करतात. शेतातली बरीच कामं अशी असतात, की जी फक्त स्त्रियाच करू शकतात. त्यामुळे त्यांना शिक्षण मिळणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं.
ह्या शाळेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, ह्या शाळेत इयत्ता नाहीत. इकडच्या अगदी लहान मुलीपासून १५ – १६ वर्षांच्या मुलींपर्यंत सगळे एकत्रच शिकतात. प्रत्येकाचा शिकण्याचा कल, वेग वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे ह्या शाळेत मुलं त्यांना जे आवडेल ते, आवडेल तेव्हा शिकतात. कोणावरही बंधनं नसतात.
ह्या शाळेत फक्त शेती शिकवली जात नाही, तर शेतीपूरक ‘पशूपालन’ आणि इतरही काही गोष्टी शिकवल्या जातात. वेगवेगळे विषय, लिहायला वाचायला शिकवलं जातं. अनिश आणि असिता यांनी २०२२ पर्यंत शाळेला शाळेच्या उत्पन्नातून सक्षम बनवायचं ठरवलं आहे.
मी ह्या शाळेबद्दल कधीच ऐकलं नव्हतं. मुलींना शेतीविषयक शिक्षण देणारी प्राथमिक शाळा बघून, त्याबद्दल ऐकून खरंच खूप छान वाटलं.
No comments:
Post a Comment